Wednesday, February 26, 2014

श्री गणेश आणि स्वामी!!


गणपती वर स्वामींचे खूप प्रेम होते. अक्कलकोटात त्यांनी ठीक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. वटवृक्ष मंदिरामधल्या गणेशाची स्थापना सुद्धा स्वामींनी स्वहस्ते केली.
अक्कलकोट च्या जुन्या राजवाड्यात स्वामींची स्वारी बर्याचवेळा जाई. राजवाड्याचा भव्य दरवाजा तब्बल १२ ते १५ फुट उंच. दरवाज्याला एक झरोका आहे. सामान्य माणूस दरवाज्याच्या झरोक्यातून सहज आत बाहेर करू शकतो. दरवाजाच्या चौकटीच्या वरच्या भागात गणपतीची लाकडात कोरलेली एक तस्वीर आहे. त्या तस्विरीला येता जाता स्वामी सहज लीलया हात लावीत आणि म्हणत 'मेरा गण्या'


एका औंसत मनुष्याला हात वर करून, पायाच्या टाचा उंचावून सुद्धा तिथे पोहोचणे शक्य नाही. स्वामी दाशरथि रामाप्रमाणे आजानुबाहू(त्यांचे हात गुढग्यापर्यंत लांब होते) होते.

स्वामी समर्थ समाधी मठ. चोळप्पा महाराजांचे घरी.



विश्वव्यापक विश्वंभरु|
त्याची कैची समाधी निर्धारु|
जगी जगप्रकार दाखवणे साचारु|
लीला थोरु समर्थांची||
-सद्गुरू आनंदनाथ महाराज.

स्वामींचा परम भक्त चोळ्या याची इच्छा अशी होती कि समर्थांचे चिरंतर वास्तव्य आपल्याच घरी असावे. अशा धर्मभोळे पणातून स्वामी समर्थ असतानाच एके दिवशी चोळप्पानी आपल्या घराच्या अंगणात समाधी खोदावयास घेतली. चोळाप्पा समाधी खोदत होता इतक्यात स्वामींची स्वारी चोळप्पाच्या घरी आली. आणि समर्थांनी मुद्दामून विचारले 'काय रे चोळ्या काय करतोस?" चोळप्पाने काहीच उत्तर नाही दिले. त्याला वाटले कि स्वामींना काहीच सांगितले
नाही तर त्यांना कशासाठी हा खटाटोप चाललाय हे कळणार नाही. स्वामी समर्थ प्रत्यक्ष परब्रम्ह होते, स्वामींच्या अन्तःसाक्षित्वाची प्रचीती चोळप्पाने वारंवार अनुभवली असूनही चोळाप्पांची प्राकृत बुद्धी त्यावेळी चालली नाही.
स्वामी त्याला म्हणाले 'चोळ्या यात आधी तुला घालीन मग च मी जाईन'. पुढे चोळप्पा महाराजांचे निधन झाले.त्यानंतर काही वर्षांनी स्वामी समर्थांचे निर्वाण झाले. आणि भक्ताच्या इच्छे खातीर चोळप्पाच्या घरी समाधी मठ आहे.
अक्कलकोट वटवृक्ष मंदिरापासून १५ मिनिटांच्या अंतरावर हा समाधी मठ आहे. दररोज हजारो भक्तांची रीघ तिथे लागलेली असते. मठात आल्यावर परम समाधान लाभते.बाजूलाच चोळप्पा महाराजांचे घर आहे. तिथे समर्थांनी वापरलेल्या वस्तू आहेत. त्या पहावयास मिळतात. स्वामींनी अक्कलकोटात येउन दुसरी लीला चोळप्पाच्या घरी केली ती म्हणजे ऐन दुष्काळात चोळप्पाच्या विहीर सुकी खडखडीत असताना तीत लघुशंका करून तिला पाणी आणवले. आज कितीही दुष्काळ असला म्हणजे ती विहीर कधीच आटत नाही. ती विहीर कुशावर्त तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे.

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||