Showing posts with label ||माऊली||. Show all posts
Showing posts with label ||माऊली||. Show all posts

Saturday, April 19, 2014

पितळे नावाच्या गृहस्थांची कथा आणि श्री साईबाबा

साईबाबा आणि स्वामी समर्थ एक आहेत याची प्रचीती देणारी हि कथा.

संदर्भ : श्री साईसतचरित्र अध्याय २६. 

मुंबईचे कुणी पितळे नावाचे गृहस्थ सहकुटुंब सहपरिवार शिर्डीला साईंच्या दर्शनास आले होते. माझ्या साईंच्या लीला सातासमुद्रा पार जाउन होत्या.
नित्य हजारो लोक साईंच्या दर्शनास शिर्डीला येत होते, त्या भक्तांच्या पुरात वाहून आणि माझ्या साईंच्या प्रेमात न्हाऊन पितळे सुद्धा पुर्वासुकृताने शिर्डीला येउन पोहोचले. बिर्हाडी वस्ती करून श्रींच्या दर्शनास आले. 
त्यांचा मुलगा आजारी असावयाचा, त्याच्या वर साईंचा कृपाप्रसाद व्हावा म्हणून च पितळे यांनी शिर्डीस येणे केले होते. अर्थात शरण मज आला आणि वाया गेला ,दाखवा दाखवा ऐसा कुणी!! या वचनानुसार पितळे यांचे मनोरथ साईंनी पुरवले होते. 
   पितळ्यांनी आपला मुलाला बाबांच्या पायावर घातले,स्वतः लोटांगण घातले इतक्यात विपरीत घडले, मुलगा एकाएकी बेशुद्ध होऊन त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. आणि निपचित जमिनीवर  राहिला. असं या  कितीदा झालं होतं. पण प्रयत्न करून सुद्धा मुलगा शुद्धीवर येत नव्हता. मात पिता चिंतातूर झाले. 
आई आई रडून आक्रोश करू लागली. हे म्हणजे असे झाले कि वाघाच्या तोंडून गाय सुटावी आणि इतक्यात कसायाने तीस पकडून न्यावे. 
   मुलाच्या आईने साईबाबांना आळवले, प्रार्थना केली,  विनवण्या केल्या. 
बाबा तिला म्हणाले तुम्ही धीर धरा,  होऊ नका, त्याला काही होणार नाही, बिर्हाडी जा, एका घटकेनंतर त्याला शुद्ध येईल. पुढे तसे केले.बाबांचे बोल खरे ठरले. मुलगा हुशार होऊन बरा झाला. 
परत साईंच्या जवळ येउन त्यांनी बाबांचे पाय धरले, आलेला प्रसंग कृपाप्रसादाने टळला, याची कृतज्ञता व्यक्त करू लागले. पुढे काही दिवस बाबांची सेवा करून पितळे मुंबईस जाण्यास निघाले,  श्रींच्या दर्शनास आले. 
बाबांनी आशीर्वाद म्हणून खिश्यातून ३ रुपये काढले आणि त्यांस देत म्हणाले
'बापू तुला मी २ रुपये पूर्वी दिले होते, आता त्यात हे तीन रुपये ठेव आणि त्यांची पूजा कर, तुझे कल्याण होईल. पितळ्यांनी आनंदाने तो प्रसाद घेऊन मुंबईस परत जाणे केले. पण त्यांच्या मनात एक आश्चर्य सलत होते. 
    मी कधी साई बाबांना याआधी भेटलो नाही,मग ते 'मी तुला आधी २ रुपये  दिले होते' असे का म्हणाले. त्यांना काहीच कळत नव्ह्ते. 
    मुंबईस आल्यावर त्यांनी त्यांच्या आईला झालेला वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांची आई म्हणाली, तू जसा आता तुझ्या मुलाला घेऊन साईंच्या दर्शनास गेला होतास, तसेच तुझे बाबा तुझ्या लहान पणी तुला घेऊन अक्कलकोटला गेले होते.तिथे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. तिथले स्वामी सुद्धा सुद्धा सिद्ध होते, साक्षात दत्तावतारी होते. त्यांनी तुझ्या वडिलांना २ रुपये प्रसाद म्हणून दिले होते आणि त्यांची पूजा कर अशी आज्ञा केली होती. तुझे वडील शुद्धाचरणी होते. त्यांनी खूप प्रेमाने त्यांची देव्हार्यात ठेऊन पूजा केली,पुढे त्यांच्या माघारी त्या सर्वांचा विसर तुम्हाला पडला. तीच खुण साईबाबांनी पटवून दिली तुला. त्या रुपयांची अव्यवस्था तुझ्या हातून घडल्याने ते गहाळ झाले. आता वेड वाकडा व्यवहार सोड. आणि आपल्या पूर्वजांना अनुसरून तू वाग. या रुपयांची पूजा कर. अशा तर्हेने पितळे सत्कर्मास लागून त्यांनी साईभक्तीमध्ये व्यतीत केले. 
    

Friday, April 11, 2014

नको डगमगू स्वामी देतील साथ

पांडू सोनार

अक्कलकोटापासून ३ कोसावर मैंदर्गी नावाचे गाव आहे. तिथे पांडू सोनार नावाचा स्वामींचा भक्त राहत होता. कर्जबाजारीपणामुळे,दारिद्र्यामुळे  धनिकाला चांदीचे दागिने सोन्याचे पाणी मारून घडवून दिले.काही दिवस हि चोरी लपली.एके दिवशी झालेली हि फसवणूक धनिकाच्या लक्षात येउन त्याने पांडू सोनारावर मामलेदाराकडे फौजदारी खटला भरला. त्यात्यासाहेब मामलेदारांनी चाबकांच्या फटक्यांची शिक्षा सुनावली.  सोनाराच्या अब्रूचे भलतेच दिवाळे निघणार होते.
       सोनाराला स्वामींशिवाय आता तरणोपाय नव्हता,त्याने त्या दयाळू माउलीचा धावा सुरु केला.
हे स्वामी समर्थ माऊली,तुम्ही भक्तवत्सल आहात, मी या संसारात गंजून हे चौर्यकर्म केले आहे.मला पश्चाताप होत आहे.
स्वामी. मला वाचवा, लेकराची अब्रू वाचवा ,धाव स्वामी माउली धाव!!!!!!!
       भक्तवत्सल भक्ताभिमानी स्वामी समर्थांना सोनाराचा कळवळा आला. स्वामींची स्नानाची वेळ होती. सेवेकरी स्वामींच्या अंगावर उन पाण्याचा तांब्या घालणार इतक्यात, स्वारी गरजली.
       मेणा लाव!!
सेवेकर्यांनी मेणा आणून समर्थांचा जयजयकार करून सेवेकरी निघाले. समर्थांनी मैंदर्गीस जाण्याचा निर्देश केला. यात्रा निघाली.पुढे मैंदर्गीस आल्यावर कुण्या भक्ताकडे न जाता, कुठल्या मंदिरात,धर्मशाळेत न उतरता स्वारी थेट कचेरीत गेली. माम्लेदारास वाटले कि स्वामींनी आपला कृपाप्रसाद मज मिळावा या उद्देशाने कचेरीत येणे केले आहे. मामालेदाराने यथोचित आदर सत्कार करून आपली खुर्ची स्वामींना देववली.सोनार समोर च उभा होता.त्यास उद्देशून
'ये रे इकडे ये' !!
असे म्हणून जवळ बसावयास सांगितले. सोनार स्वामींच्या चरणाजवळ येउन बसला मामलेदारास त्याचा हेवा वाटला. स्वामींनी काही वेळाने सोनारास म्हणाले.
हं बसलास का,जा सरबराईस जा!!
असे ऐकताच पांडूने स्वामींच्या सेवेची व्यवस्था लावण्यास सुरुवात केली.दुसरे दिवशी पर्यंत सोनार स्वामींसन्निध होता. महाराजांचे त्या सोनारावरचे प्रेम पाहून मामालेदाराने पांडूची शिक्षा रद्द करून त्यास सोडून दिले. पुढे मोठ्या आनंदाने सोनाराने आपली घडलेली गोष्ट सेवेकार्यांस सांगितली असता.स्वामी स्नान करता करता मैंदर्गीस जाण्याची योजना सेवेकर्यांना कळून आली.
अशा तर्हेने 'स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे आशिर्वचन सार्थ करीत आहेत
।।श्री स्वामी समर्थ।।

Tuesday, April 1, 2014

उद्धवाने उद्धार हा केला

आज चैत्र शुद्ध द्वितीया स्वामींचा प्रकटदिन.

इ.स १४५७ च्या दरम्यान श्रीनृसिंह सरस्वती गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन करून श्री शैल्य यात्रेला निघाले. आणि कर्दळी वनात गुप्त झाले. तिथे त्यांना समाधी लागली. तब्बल ३०० वर्ष समाधीवस्थेत असल्याने त्यांच्या भोवती मुंग्यांचे वारूळ निर्माण झाले होते. आता नवीन अवतार व्हावयाचा होता.नास्तिकांना आस्तीकतेचा मार्ग सुलभ करून द्यावयाचा होता.कर्मकांड,धर्मभोळेपणा,जातपातीची माणुसकीला लागलेली कसर दूर करावयाची होती. दुखी,गांजलेले तारावयाचे होते.
यासाठी निमित्त हवा होतं. निमित्त उद्धव लाकूडतोड्या झाला.

Saturday, March 15, 2014

'बुडणारे जहाज वाचवले'


ठाण्यातील लक्ष्मण कोळी आपल्या स्वजनांसहित अक्कलकोट ला श्रींच्या दर्शनास आला होता. श्रींवर त्याची खूप श्रद्धा जडली. पुढे एकदा मासेमारीच्या मोसमात तो त्याचे गलबत घेऊन मुंबईच्या किनार्यावर निघाला त्यावेळी नेमके वादळ घोंगावू लागले. वादळाने रुद्र अवतार धारण केला. लक्ष्मणाचे गलबत हेलकावे खाऊ लागले. परिणाम काय आहे हे गलबतावरच्या सर्व खलाशांना आणि लक्ष्मण कोळ्याला कळून चुकले.आता या संकटातून आपले कौशल्य, आज पर्यंत चा अनुभव कामी येत नाही असे लक्षात आल्यावर लक्ष्मणाने श्री स्वामी समर्थ माउली चा धावा सुरु केला.
''हे अक्कलकोट निवासिनी आई SSSSSSS लेकरं संकटात आहेत. धाव आई धाव. या आम्हा सर्वांची तारणहार तूच आहेस.''

इकडे वटवृक्षा खाली विचित्र लीला घडत होती.

स्वामी वडाखाली पलंगावर निजलेले असता. अचानक फटका मारल्या सारखा हवेत हात फिरवला. स्वामींच्या हातातून एकाएकी पाणी पडले.जमलेल्या भक्त गणांना आश्चर्य वाटले. आणि अजून एक अतर्क्य लीला अनुभवयास मिळणार अशा औत्सुक्याने काहींनी स्वामींना विचारले.
स्वामी काय केलेत.आणि हे पाणी कसलं.
स्वामी म्हणाले 'अरे जहाज बुडत होतं! ते बाहेर काढलं'
काहींनी पाण्याची चव घेऊन पाहिली तर चव निव्वळ खारट लागली होती.कुणालाच समर्थांचा हा विचित्र खेळ समजला नव्हता.

इकडे समुद्रात गलबताला एकाएकी जोरात हेलकावा मारून गलबत स्थिर झाले होते. वादळ शमले होते. वादळ शमू शकते या निसर्गाच्या खेळाचा अंदाज लक्ष्मण कोळ्याला होताच. पण एकाएकी धक्का बसून आपले गलबत बुडता बुडता स्थिर कसे झाले याचा काही उगम लक्ष्मण कोळ्याला झाला नाही.
हि स्वामींचीच काही लीला होती हे मात्र कळून चुकले.

लक्ष्मण कोळी मोठ्या आनंदाने स्वामींचे आभार मानत, गुणगान गात किनार्यावर आला.आणि लगेचच अक्कलकोट ला निघण्याची तयारी केली.लक्ष्मण कोळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत विलक्षण कृतज्ञतेने अक्कलकोटी स्वामींचे दर्शन घेण्यास आला. दर्शन घेतले आणि झाला प्रसंग सर्व भाविक भक्तांना सांगितला. तेव्हा १५ दिवसांपूर्वी स्वामींनी केलेल्या लीलेचा, खारट पाणी, अचानक पलंगावरून उठून हवेत मारलेला हात या सर्वांचा उगम सर्वांस झाला.दर्शन घेऊन लक्ष्मण कोळी मोठ्या आनंदाने ठाण्यास परतला आणि तिथे स्वामींचा मठ उभारून स्वामींची सेवा करू लागला.

अशा अनेक कथा ज्यांमध्ये स्वामी माऊली आपल्या असंख्य लेकरांचे रक्षण कसे करते त्याचे दाखले आहेत. त्या आपण या ब्लॉग च्या माध्यमातून वाचणार आहोत.

||श्री स्वामी समर्थ||

Friday, March 14, 2014

श्री स्वामी समर्थ

स्वामीसुतांचे आशीर्वचन
” श्रद्धा,सचोटी आणि अढळ स्वामी निष्ठा तुमच्या ठायी आहे तो वर सर्व बाजूंनी भरभराटच होइल हे निश्चित,अशक्य ही शक्य करतील स्वामी..” 


– श्री स्वामी सूत.
|| भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ||
|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||