Monday, April 7, 2014

लख्याची गोष्ट

एकदा मुंबईतील काही भक्त मंडळी अक्कलकोटला दर्शनास आली होती. हि सर्व बाणकोट मधील बालेमंडळी होती.त्यांत एक लख्या म्हणून लहान पोर्या होता.त्याला ब्रम्हचारी बुवांनी बाजारातून गुळ आणण्यास पैसे देऊन पाठवले.लख्या गुळ घेऊन येत असता त्याला मोह आवरला नाही.त्याने त्यातला गुळ खाण्यास सुरुवात केली. इकडे श्री स्वामी समर्थ म्हणू लागले.....'लखा भोसडीचो गुळ खाता...माका देत नाय'.....असे म्हणून स्वामी उं उं करून लहान मुलाप्रमाणे रडू लागले.
हा सगळा प्रकार पाहून त्यातील काही मंडळी बाजारकडे गेली.तेव्हा लख्या येता येता गुळ खाताना दिसला....तेव्हा समर्थांच्या कृतीचा सर्वांना उगम झाला.
स्वामी माउली कधी कधी अशीच गम्मत करत असे.कुणी दर्शनास आले कि त्यास त्याच्या मनातील ओळखून त्याची खुण पटवून देत. कधी कुणी परगाव चा अन्यभाषिक भक्त आला त्याला त्याच्या भाषेत बोलून अन्तःसाक्षित्वाची प्रचीती देत.
त्यांच्या जवळ एक पितळेची कडी होती.त्या कडीवर गणपती,लक्ष्मी,विष्णू अशा देवांची चित्रे कोरलेली होती.कुणी भक्त आला त्यास त्याच्या उपास्य इष्टदेवतेच्या चित्रावर बोट ठेवून त्यास खुण पटवून देत.

।।श्री स्वामी समर्थ।।
।।जय जय स्वामी समर्थ।।

Tuesday, April 1, 2014

उद्धवाने उद्धार हा केला

आज चैत्र शुद्ध द्वितीया स्वामींचा प्रकटदिन.

इ.स १४५७ च्या दरम्यान श्रीनृसिंह सरस्वती गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन करून श्री शैल्य यात्रेला निघाले. आणि कर्दळी वनात गुप्त झाले. तिथे त्यांना समाधी लागली. तब्बल ३०० वर्ष समाधीवस्थेत असल्याने त्यांच्या भोवती मुंग्यांचे वारूळ निर्माण झाले होते. आता नवीन अवतार व्हावयाचा होता.नास्तिकांना आस्तीकतेचा मार्ग सुलभ करून द्यावयाचा होता.कर्मकांड,धर्मभोळेपणा,जातपातीची माणुसकीला लागलेली कसर दूर करावयाची होती. दुखी,गांजलेले तारावयाचे होते.
यासाठी निमित्त हवा होतं. निमित्त उद्धव लाकूडतोड्या झाला.
|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||