Tuesday, February 18, 2014

श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचे तिसरे पूर्णावतार.

नृसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेच्या निमित्ताने कर्दली वनात गुप्त झाले. याच वनात तीनशे वर्षे ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात त्यांच्या दिव्य शरीराभोवती मुंग्यांनी प्रचंड वारूळ निर्माण केले. या जंगलात एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळावर चुकून बसला व श्री स्वामी वारुळातून बाहेर आले. 
'त्यानंतर स्वामींनी पूर्ण भारत भर भ्रमण केले.व त्यानंतर अक्कलकोटी येउनि स्थिरावले. या काळात त्यांनी अनेक भक्तांना दत्तरुपत दर्शन दिले तर कुणाला दृष्टांतामधून दत्तरुपाने 'मी सध्या प्रत्यक्ष रूपाने अक्कलकोटी आहे'. असे सांगितले.
त्याच ह्या कथा. 


१) एके दिवशी गाणगापुरातले काही पुजारी श्रींच्या दर्शनाला आले.दर्शन झाल्यानंतर समर्थांनी त्यांना तुमच्या देवाचे नाव काय असे विचारले. त्यावर पुजार्यांनी 'नृसिंहसरस्वती' असे उत्तर दिले. त्यावर समर्थ म्हणाले आमच्या देवासही नृसिंहभान असे म्हणतात बरे! 

२) एका घाटावरील ब्राह्मणाने गाणगापुरच्या नृसिंहसरस्वतींना मुलगा झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरात येउन करेन असा नवस केला. मुलगा झाला, त्यानंतर काही वर्षांनी नवस फेडावयास म्हणून तो ब्राह्मण सहकुटुंब गाणगापुरास निघाला.
अक्कलकोटा नजीक येउन नेमके त्याच्या जवळचे पैसे संपले. त्यांने स्वामी समर्थांविषयी ऐकले होते. तो स्वामींच्या दर्शनास आला आणि स्वामींजवळ त्याने आपले मनोगत व्यक्त केले कि आता गाणगापुरला जाउन नवस फेडणे शक्य नाही तरी तुम्ही प्रत्यक्ष दत्तावतारी आहात. मी तुमच्या इथेच नवस फेडतो. स्वामींनी मान हलवली. इतक्यात ब्राम्हणाला पैशाची मदत होऊन त्याने उपनयन विधी हि उरकला आणि मोठ्या आनंदाने तो स्वगृही आला. त्यानंतर प्रत्यक्ष दत्तगुरूंनी नवसाची सांगता झाल्याचा स्वप्नात दृष्टांत झाला .

2)  मुंबईचे ठाकूर दास बुवा हे मुळचे दत्तभक्त, गाणगापुरच्या श्रींवर श्रद्धा होती. पुढे प्रारब्धकर्माने त्यांच्या अंगावरती श्वेतकुष्ठ आले. चेहरा विद्रूप दिसू लागला. दोन वर्षापर्यंत अनेक उपचार केले पण काही गुण आला नाही. त्यांना खूप दुःख झाले. त्यांनी ठरवले कि आता काशी क्षेत्रात वास करून राहणे योग्य. तेव्हा ते सहकुटुंब गाणगापुरला शेवटचे दर्शन घेण्यास निघाले. श्रींच्या पादुकांवर त्यांनी कस्तुरी अर्पण करावी अशी त्यांची इच्छा होती. तसे त्यांनी उत्तम कस्तुरी विकत घेऊन आणली होती. दर्शन घेऊन ते ती कस्तुरी पादुकांवर अर्पण करण्यास विसरले. पुढे त्यांनी देवळात कीर्तन केले. उत्तम प्रकारे मनोभावे सेवा केलि. व काशीस जाण्याची आज्ञा मागितली. रात्री स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला. दत्तगुरू स्वये स्वप्नात येउन म्हणाले कि मी अक्कल्कोति वास करून आहे, माझे तुला प्रत्यक्ष दर्शन होइल. आणि तुझा कुष्टपरिहार होइल.सकाळी बुवांना स्वप्नाचे स्मरण झाले. त्यासरशी बुवांनी दर्शन घेऊन अक्कलकोट चा रस्ता धरला. अक्कलकोटी आल्यानंतर स्वामींना पाहून ते हरवून गेले.लगबगीने दर्शन घेण्यासाठी चरणावरती डोके ठेवले इतक्यात स्वामी त्यांस म्हणाले. 'हमारी कस्तुरी अभी का अभी लाव' 
बुवांना कस्तुरी श्री दत्तां प्रित्यर्थ आणल्याचे स्मरले,परंतु ती गाणगापुरला अर्पण करण्यास  विसरलो याची जाणीव झाली आणि स्वामी समर्थ साक्षात दत्त अवतार आहेत,त्यांच्या अन्तःसाक्षित्वाची कल्पना आली. लगेच च त्यांनी कस्तुरी स्वामींना अर्पण केली. स्वामींनी हसत हसत ती तिथे असलेल्या लहान मुलांमध्ये वाटून टाकली. पुढे काही काळाने स्वामी कृपेने बुवांचा दुर्धर श्वेतकुष्ठ बरा झाला . 

३)कर्नाटकातील श्रीधर नावाचा गृहस्थ पोटशूलाच्या व्याधी ने त्रस्त झाला होता. बरेच दिवस तो गुण यावा म्हणून गाणगापुरला दत्तपादुकांची सेवा करत होत. एके रात्री यतीरुपाने दत्तगुरूंनी स्वप्नात येउन त्याला सांगितले श्रिपुरिच्या झाडाचा रस काढून त्यात सैंधव व सुंठ घालून सेवन कर म्हणजे तुझी व्याधी जाइल.सकाळी त्याला याचे स्मरण झाले. पण श्रिपुरिचे झाड म्हणजे नेमके कोणते हे त्यास कळेना. त्याने गावातील जाणकारांना, वैद्यांना याबाबत विचारले पण कुणीच काही संगे ना,श्रीधर अशाच भ्रांतीत असताना त्यास श्रींनी स्वप्नात येउन सांगितले कि अक्कलकोटास परमहंसस्वामी आहेत, ते तुला याबद्दल सांगतील. तो दुसरे दिवशी तडक अक्कलकोटास गेला, श्रींची मूर्ती पाहून त्यास परम समाधान झाले. दर्शन घेणार इतक्यात स्वामींनी त्यास सांगितले अरे कडूनिंबाच्या झाडास श्रिपुरि असे म्हणतात त्यात सैंधव आणि सुंठ घालून तीन दिवस घे म्हणजे तुझी व्याधी जाइल. तसे केल्यानंतर श्रीधर चा पोटशूळ नाहीसा झाला. 

श्री स्वामींची श्री पूज्य गोपाळ बुवा केळकर लिखित बखर वाचल्यास कितीतरी जणांना जे गाणगापूर, नरसोबाची वाडी, पंढरपूर अशा ठिकाणी उपासना करत होते त्यांना अक्कलकोटी प्रत्यक्ष रूपाने दर्शन होईल असे दृष्टांत झाल्याच्या कथा दखल म्हणून आहेत. आजही कित्येक भाविकांना याची प्रचीती येते. तर माणिकप्रभू, साईबाबा, गजानन महाराज यांनी सुद्धा स्वामी समर्थ आणि आमच्यात काही भेद नाही अशा लीला भक्तांना दाखविल्या त्याबद्दल च्या नोंदी श्री साई चरित व इतर चरित्रांमध्ये आहेत. 

येथे भक्तकवी मिलिंदमाधव कृत स्वामींच्या छोट्या चरित्र पोथीमधील काही श्लोकांचा संदर्भ द्यावासा वाटतो. 

स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे |
तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||

पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ |
गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||

तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार |
अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||

।।श्री स्वामी समर्थ ।।
जय जय स्वामी समर्थ ।।






No comments:

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||