Friday, April 11, 2014

नको डगमगू स्वामी देतील साथ

पांडू सोनार

अक्कलकोटापासून ३ कोसावर मैंदर्गी नावाचे गाव आहे. तिथे पांडू सोनार नावाचा स्वामींचा भक्त राहत होता. कर्जबाजारीपणामुळे,दारिद्र्यामुळे  धनिकाला चांदीचे दागिने सोन्याचे पाणी मारून घडवून दिले.काही दिवस हि चोरी लपली.एके दिवशी झालेली हि फसवणूक धनिकाच्या लक्षात येउन त्याने पांडू सोनारावर मामलेदाराकडे फौजदारी खटला भरला. त्यात्यासाहेब मामलेदारांनी चाबकांच्या फटक्यांची शिक्षा सुनावली.  सोनाराच्या अब्रूचे भलतेच दिवाळे निघणार होते.
       सोनाराला स्वामींशिवाय आता तरणोपाय नव्हता,त्याने त्या दयाळू माउलीचा धावा सुरु केला.
हे स्वामी समर्थ माऊली,तुम्ही भक्तवत्सल आहात, मी या संसारात गंजून हे चौर्यकर्म केले आहे.मला पश्चाताप होत आहे.
स्वामी. मला वाचवा, लेकराची अब्रू वाचवा ,धाव स्वामी माउली धाव!!!!!!!
       भक्तवत्सल भक्ताभिमानी स्वामी समर्थांना सोनाराचा कळवळा आला. स्वामींची स्नानाची वेळ होती. सेवेकरी स्वामींच्या अंगावर उन पाण्याचा तांब्या घालणार इतक्यात, स्वारी गरजली.
       मेणा लाव!!
सेवेकर्यांनी मेणा आणून समर्थांचा जयजयकार करून सेवेकरी निघाले. समर्थांनी मैंदर्गीस जाण्याचा निर्देश केला. यात्रा निघाली.पुढे मैंदर्गीस आल्यावर कुण्या भक्ताकडे न जाता, कुठल्या मंदिरात,धर्मशाळेत न उतरता स्वारी थेट कचेरीत गेली. माम्लेदारास वाटले कि स्वामींनी आपला कृपाप्रसाद मज मिळावा या उद्देशाने कचेरीत येणे केले आहे. मामालेदाराने यथोचित आदर सत्कार करून आपली खुर्ची स्वामींना देववली.सोनार समोर च उभा होता.त्यास उद्देशून
'ये रे इकडे ये' !!
असे म्हणून जवळ बसावयास सांगितले. सोनार स्वामींच्या चरणाजवळ येउन बसला मामलेदारास त्याचा हेवा वाटला. स्वामींनी काही वेळाने सोनारास म्हणाले.
हं बसलास का,जा सरबराईस जा!!
असे ऐकताच पांडूने स्वामींच्या सेवेची व्यवस्था लावण्यास सुरुवात केली.दुसरे दिवशी पर्यंत सोनार स्वामींसन्निध होता. महाराजांचे त्या सोनारावरचे प्रेम पाहून मामालेदाराने पांडूची शिक्षा रद्द करून त्यास सोडून दिले. पुढे मोठ्या आनंदाने सोनाराने आपली घडलेली गोष्ट सेवेकार्यांस सांगितली असता.स्वामी स्नान करता करता मैंदर्गीस जाण्याची योजना सेवेकर्यांना कळून आली.
अशा तर्हेने 'स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे आशिर्वचन सार्थ करीत आहेत
।।श्री स्वामी समर्थ।।

Monday, April 7, 2014

लख्याची गोष्ट

एकदा मुंबईतील काही भक्त मंडळी अक्कलकोटला दर्शनास आली होती. हि सर्व बाणकोट मधील बालेमंडळी होती.त्यांत एक लख्या म्हणून लहान पोर्या होता.त्याला ब्रम्हचारी बुवांनी बाजारातून गुळ आणण्यास पैसे देऊन पाठवले.लख्या गुळ घेऊन येत असता त्याला मोह आवरला नाही.त्याने त्यातला गुळ खाण्यास सुरुवात केली. इकडे श्री स्वामी समर्थ म्हणू लागले.....'लखा भोसडीचो गुळ खाता...माका देत नाय'.....असे म्हणून स्वामी उं उं करून लहान मुलाप्रमाणे रडू लागले.
हा सगळा प्रकार पाहून त्यातील काही मंडळी बाजारकडे गेली.तेव्हा लख्या येता येता गुळ खाताना दिसला....तेव्हा समर्थांच्या कृतीचा सर्वांना उगम झाला.
स्वामी माउली कधी कधी अशीच गम्मत करत असे.कुणी दर्शनास आले कि त्यास त्याच्या मनातील ओळखून त्याची खुण पटवून देत. कधी कुणी परगाव चा अन्यभाषिक भक्त आला त्याला त्याच्या भाषेत बोलून अन्तःसाक्षित्वाची प्रचीती देत.
त्यांच्या जवळ एक पितळेची कडी होती.त्या कडीवर गणपती,लक्ष्मी,विष्णू अशा देवांची चित्रे कोरलेली होती.कुणी भक्त आला त्यास त्याच्या उपास्य इष्टदेवतेच्या चित्रावर बोट ठेवून त्यास खुण पटवून देत.

।।श्री स्वामी समर्थ।।
।।जय जय स्वामी समर्थ।।
|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||