Friday, March 14, 2014

श्री स्वामी समर्थ

||श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत 


विष्णू बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृत हा २१ अध्यायी प्रासादिक पारायण ग्रंथ लिहिला. विष्णू बुवांचा जन्म रत्नागिरीतील पालशेत मध्ये झाला.व्यवसायाने ते शिक्षक होते.पुढे कुणी शंकर शेट नावाच्या मारवाडी स्वामीभक्त स्नेह्यामुळे विष्णुबुवा सुद्धा स्वामी भक्ती करू लागले. आणि कोणतीही काव्य शक्ती नसताना त्यांनी स्वामीचरित्र सारामृत लिहिले.
आज हा प्रासादिक ग्रंथ गेली कित्येक दशके लाखो घरात पुजला जातो, भजला जातो, अनेक भाविक, आबालवृद्ध या ग्रंथाचे प्रेमाने पारायण करून स्वामींची सेवा करत आहेतस्वामींनी त्यांना पाऊलो-पाऊली प्रचीती दिली आहे आणि देत राहतील. आणि भक्तवत्सल भक्ताभिमानी हे विशेषण अजून दृढ करतील
पारायण सुलभ पद्धतीने करता येते.रोज ,,,२१ अशा अंकामध्ये अध्याय वाचता येतात. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये एक अध्याय जरी वाचला,इतकी सेवा सुद्धा स्वामींपर्यंत पोहोचली जाते. ओवीबद्ध रचना, स्वामींच्या लीलांचे अद्भुत वर्णन यामुळे हा ग्रंथ वाचता वाचता भाविक तल्लीन होऊन जातात
आपण सुद्धा या पवित्र ग्रंथाचे पारायण करून आपल्या या व्याप युक्त जीवनात समाधान आणूया आणि स्वामींची सेवा करूया
स्वामी हजार हातांनी देताहेत, पण घेणार्याचे हात मात्र दोन आणि दिलेले साठवण्यासाठी मनाची खोली मात्र संकुचित आहे
।।श्री स्वामी समर्थ।।


No comments:

|| भीऊ नकोस 'मी' तुझ्या पाठीशी आहे ||